Tuesday, December 23, 2014

We The People !!!!

खूप दिवसांपासून लिहीन म्हणत होतो, पण वेळेअभावी जमत नव्हतं, आज सकाळी पेपर वाचताना प्रकर्षाने जाणवलं की आज लिहिलाच पाहिजे ब्लॉग. अनेक दिवस झाले एक विषय तरळतोय डोक्यात. आपलं सरकार - आपला देश आणि आपली भारतीय लोकं....

अजबच विषय म्हणावा लागेल, इतके दिवस आपल्याला हवं ते सरकार येण्यासाठी खूप प्रयत्न, कष्ट, प्रार्थना सुरु होत्या आपल्या सगळ्यांच्याच, आणि आता ते साध्य झाल्यानंतर, काही दिवसातच आपल्यातलेच लोक सरकारला कसं खाली खेचता येईल याच्याच मागे लागताना दिसतायत. केंद्रात भा.ज. पा. चं सरकार आलं. माननीय मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले. उभ्या भारताचं स्वप्न सत्यात उतरलं. त्यांचा कार्यकाळ ६ महिने झाला नसेल, ६५ वर्ष राज्य केलेले लोक हिशोब मागू लागले. किती दुर्दैवी आहे ही गोष्ट? ६५ वर्षे केलेला कचरा ६ महिन्यात कसा साफ होऊ शकतो ? 

ते राहिलं, माननीय मोदी साहेबांनी ज्या प्रकारच्या योजना आणि धोरणे अवलंबली आहेत त्याचे परिणाम दूरगामी होणार आहेत यात शंका नाही. चीन सारख्या कपटी देशाला जेरीस आणण्यासाठी ऑस्ट्रलिया आणि जपान ची मनधरणी हा डाव पहिल्या काही दिवसात मोदिजींनी टाकून एक अतिशय मुत्सद्दी विचार पणाला लावला आहे. ह्या शिवाय चीनची कोंडी करणे भारताला शक्य होणार नाही. क्या बात है, असा विचार या आधी कधी झाला होता ? नेतृत्व बदलामुळे झालाय यात आपलं हित आहे. हे सगळ्यांना पटतंय. काही लोकांना मोदिजी परदेश वाऱ्या का करत आहेत असा प्रश्न पडलाय. असो. 

"स्वच्छ भारत अभियान", "मन की बात" असे एकाहून एक सरस उपक्रम हाती घेतलेत, आणि त्यांची अंमलबजावणी जातीने माननीय पंतप्रधान करत आहेत. ही विशेष अभिनंदनीय बाब वाटते मला. मन की बात तर एक अप्रतिम योजना आहे, ज्याद्वारे सामान्य जन पंतप्रधानांशी थेट संपर्क साधू शकतात. इतकी पारदर्शकता याआधी कधीच दिसली नव्हती राजकारणात. 








आता, स्वच्छ भारत अभियान म्हणजे फक्त रस्त्यावरचा कचरा साफ करणे नसून - प्रिय भारतीय जनहो, आपण स्वत: कुठेही कचरा न फेकणे म्हणजे पर्यायाने भारत स्वच्छ राहील असा आहे. रस्त्यावर येता जाता "थुंकणाऱ्या", "थुकराट" लोकांना कोण आणि कसं सांगणार हे अभियान म्हणजे काय आहे ते ? मतितार्थ हा की, सगळ्या गोष्टी सरकार करणार नाही, आपण सजग आणि जबाबदार नागरिक म्हणून काही गोष्टी कटाक्षाने पाळणे खूप महत्वाचे आहे. हे आपण कधी समजणार? किती वर्षे आपण सरकारला दोष देत राहणार फक्त? 

आता राज्यात पण त्यांचेच सरकार आले, Central Governance हे पंतप्रधानांचे उद्दिष्ट साध्य झाले, त्यासाठी अपार मेहेनत घ्यावी लागली अनेकांना आणि मगच हे फळ दिसलंय यंदाच्या विधानसभा निवडणुकीत. इतक्या वर्षांनी, काहीतरी चांगले बदल आजूबाजूला घडतायत, विकासासाठी पोषक वातावरण निर्माण होतंय, तेव्हा स्थानिक राजकारणासाठी काही लोकांनी आडवा पाय घातला, फार्स केला, राग रुसवे दाखवले, काही उपयोग झाला नाही त्याचा, शेवटी सत्तेच्या हव्यासामुळे सत्तेत सहभागी व्हावंच लागलं ना? मग राज्याचा विकास महात्वाचा असून आपले Egos कशाला मध्ये आणायचे? निवडणुकीआधी सुद्धा आणि नंतर सुद्धा. ज्याला मनापासून काम करायचं असतं तो काम करतो. नाटकं करत नाही. अतिशय अपरिपक्व राजकारणाचं उत्तम उदाहरण. आता सत्ता स्थापना झालीये. चांगल्या विकासासाठी एकत्र झटणे हीच परम इच्छा असली पाहिजे सगळ्यांची, बघू आता काय होतंय ते; पण आपण सगळ्यांनी Patience ठेवलाच पाहिजे. परिस्थिती सुधारेल. विश्वास हवा. 

केंद्रात उत्तम कारभार सुरु असताना, काही लोकांनी धर्माच्या वावड्या उठवायला सुरुवात केली आहे, अहो, यासाठी हे सरकार नाहीये. विकास आणि फक्त विकास यासाठी आहे. कुठेतरी भारतीय माणूस चांगले दिवस बघायची सुरुवात करायला लागला की यांना धर्म का सुचतो ? देवास ठाऊक. घातक आहे हा विचार. माणुसकी हा एकच धर्म अस्तित्वात असला पाहिजे. 
आजही आपल्याकडे या बद्दल जन प्रबोधन करण्यासाठी, "Oh My God" किंवा "PK" सारख्या कलाकृतींची निर्मिती करावी लागते. तरी लोक बोध घेत नाहीत. 





थोडक्यात, सामान्य जनांच्या इच्छेनुसार राज्यकर्ता निवडलेला आहे, राज्यकारभार व्यवस्थित सुरु आहे, नवीन बदल घडत आहेत, विकास आणि उन्नती काही वर्षात साधेल अशी हवा आहे, तेव्हा आपण सर्वांनी यात सकारात्मक हातभार लावला पाहिजे, नकारात्मक गोष्टी दूर ढकलून उद्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे सुबत्ता येईल. भारताला जगात महासत्ता बनायचे असेल तर भारतीय लोकांनी त्यासाठी स्वत: मध्ये बदल घडवून आपल्या देशाला मान मिळवून द्यावा लागेल. 

आज जे विचार मी मांडतोय ते केवळ भा.ज. पा. किंवा माननीय पंतप्रधान यांचा उदो उदो करण्यासाठी म्हणून नसून, आपल्या आजूबाजूला इतक्या काळानंतर काहीतरी बदलताना दिसतंय म्हणून लिहितोय. एवढ्या वर्षांच्या गलिच्छ राजकारणातून झालेल्या चिखलात उतरून कोणीतरी तो चिखल साफ करू पाह्तंय, हे खूप आशादायी चित्र आहे. शेवटी सिस्टीम मध्ये शिरून सिस्टीम बदलणं महत्वाचं आहे.  सध्याचं सरकार हे कार्य तडीस नेईलच, तेव्हा आपण सगळ्यांनी या कार्याला प्रतिसाद देऊन, आणि स्वत: पासून सुरुवात करून आपल्या देशाच्या उज्वल भविष्यासाठी काम केलं पाहिजे. 


No comments:

Post a Comment

Followers