आज मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करणार आहे. खाली एका विडिओची लिंक देतोय. तुमच्या सवडीने नक्की बघाच.
'आज विराट कोहलीने लेगला नीट फलंदाजी केली नाही ना?' असे जे चावडीवरच्या गप्पा आपण मारत असतो, तेच राजकारण म्हटलं की अजून तावातावाने बोलत सुटतो. आपल्याला रेफरन्स असतो तो आपल्या आजूबाजूला असलेल्या भ्रष्ट मीडियाच्या भीषण अस्त्रांचा. म्हणजेच टी.व्ही. किंवा रक्तरंजित वर्तमानपत्रे. पण आपण Facts तपासूनही पाहत नाही. किंवा सोप्पं म्हणजे आपल्याला माहीतच नसतात ते.
साधं "मत द्या" असं ओरडून / भिका मागून सांगायला लागतं वोटिंगच्या दिवशी आपल्याला; पण मत द्यायला आपण एका पायावर तयार.
आजकाल खूप ओरड ऐकतोय, "अच्छे दिन ? ? ? कुठेयत ? ? ? "
मोदीजी म्हणाले होते - सामान्य माणूस पिचतोय - Intolerance - वगैरे.....
गेली ६५ वर्ष ज्या घराण्याने / पक्षाने सत्ता उपभोगली, त्याचे पडसाद एका वर्षात पुसता कसे येतील ? त्याला वेळ लागणारच. जर झाडाच्या मुळांनाच कीड लागलेली असेल तर ते उपटून नवी रोपं लावायला लागतात आणि ती मोठी व्हायला वेळ लागतो.
काल हा इंटरव्यू पाहिला. आणि खूप समाधान वाटलं, की आज भारतात काही हुशार आणि प्रामाणिक लोक महत्वाच्या हुद्द्यांवर जबाबदारी सांभाळत आहेत. मनोहर पर्रीकर यांच्या बद्दलची प्रचीती गोव्यात गेल्यावरच अनेकदा आली होती. पण त्यांचा अभ्यास आणि त्यांचा प्रामाणिकपणा आणि सचोटी पाहून थक्क झालो. कुठल्याही डिफेन्स मिनिस्टर चा याआधी इतका परखड जबाब मी ऐकलेला नाही. त्यांचं KNOWLEDGE बघा. त्यांची विषयावरची पकड किती जबरदस्त आहे याचा खूप अभिमान वाटला.
त्यांच्याप्रमाणेच सध्या भारतीय रेल्वे चे माननीय मंत्री श्री. सुरेश प्रभू यांचंही कार्य सध्या जोरात आणि जोमात सुरु आहे. याची प्रचीती फक्त रेल्वे स्टेशन ला गेल्यावर येऊ शकते.
आजच्या म.टा. मध्ये माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याही धोरणात्मक निर्णयाचं कौतुक करणारा लेख आलाय. असे अनेक नेते चांगलं काम करत आहेत. माननीय पंतप्रधानांनी नेमून दिलेली ही मंडळी आपापल्या पदांवर उत्तम काम करताहेत. याची प्रचीती येतेय. अजून ४ वर्षे आहेतच पुढे काय होतंय ते पहायला.
आपण फक्त patience ठेवला पाहिजे. आणि मिडियावर कितपत विश्वास ठेवायचा हे ठरवायची वेळ आलीये. कोण किती पैसे देऊन कुठली बातमी कुठे फिरवतो यापेक्षा मुळात field level वर काय काम चालू आहे ते पाहणं जास्त महत्वाचं आहे.
हा विडीयो पहा आणि आपण ज्यांना निवडून दिलय त्यांच्यावर समाधानाने विश्वास ठेवा......चांगले दिवस येणारच !!!!!!
https://www.youtube.com/watch?v=0vANeT930Bg
'आज विराट कोहलीने लेगला नीट फलंदाजी केली नाही ना?' असे जे चावडीवरच्या गप्पा आपण मारत असतो, तेच राजकारण म्हटलं की अजून तावातावाने बोलत सुटतो. आपल्याला रेफरन्स असतो तो आपल्या आजूबाजूला असलेल्या भ्रष्ट मीडियाच्या भीषण अस्त्रांचा. म्हणजेच टी.व्ही. किंवा रक्तरंजित वर्तमानपत्रे. पण आपण Facts तपासूनही पाहत नाही. किंवा सोप्पं म्हणजे आपल्याला माहीतच नसतात ते.
साधं "मत द्या" असं ओरडून / भिका मागून सांगायला लागतं वोटिंगच्या दिवशी आपल्याला; पण मत द्यायला आपण एका पायावर तयार.
आजकाल खूप ओरड ऐकतोय, "अच्छे दिन ? ? ? कुठेयत ? ? ? "
मोदीजी म्हणाले होते - सामान्य माणूस पिचतोय - Intolerance - वगैरे.....
गेली ६५ वर्ष ज्या घराण्याने / पक्षाने सत्ता उपभोगली, त्याचे पडसाद एका वर्षात पुसता कसे येतील ? त्याला वेळ लागणारच. जर झाडाच्या मुळांनाच कीड लागलेली असेल तर ते उपटून नवी रोपं लावायला लागतात आणि ती मोठी व्हायला वेळ लागतो.
काल हा इंटरव्यू पाहिला. आणि खूप समाधान वाटलं, की आज भारतात काही हुशार आणि प्रामाणिक लोक महत्वाच्या हुद्द्यांवर जबाबदारी सांभाळत आहेत. मनोहर पर्रीकर यांच्या बद्दलची प्रचीती गोव्यात गेल्यावरच अनेकदा आली होती. पण त्यांचा अभ्यास आणि त्यांचा प्रामाणिकपणा आणि सचोटी पाहून थक्क झालो. कुठल्याही डिफेन्स मिनिस्टर चा याआधी इतका परखड जबाब मी ऐकलेला नाही. त्यांचं KNOWLEDGE बघा. त्यांची विषयावरची पकड किती जबरदस्त आहे याचा खूप अभिमान वाटला.
त्यांच्याप्रमाणेच सध्या भारतीय रेल्वे चे माननीय मंत्री श्री. सुरेश प्रभू यांचंही कार्य सध्या जोरात आणि जोमात सुरु आहे. याची प्रचीती फक्त रेल्वे स्टेशन ला गेल्यावर येऊ शकते.
आजच्या म.टा. मध्ये माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याही धोरणात्मक निर्णयाचं कौतुक करणारा लेख आलाय. असे अनेक नेते चांगलं काम करत आहेत. माननीय पंतप्रधानांनी नेमून दिलेली ही मंडळी आपापल्या पदांवर उत्तम काम करताहेत. याची प्रचीती येतेय. अजून ४ वर्षे आहेतच पुढे काय होतंय ते पहायला.
आपण फक्त patience ठेवला पाहिजे. आणि मिडियावर कितपत विश्वास ठेवायचा हे ठरवायची वेळ आलीये. कोण किती पैसे देऊन कुठली बातमी कुठे फिरवतो यापेक्षा मुळात field level वर काय काम चालू आहे ते पाहणं जास्त महत्वाचं आहे.
हा विडीयो पहा आणि आपण ज्यांना निवडून दिलय त्यांच्यावर समाधानाने विश्वास ठेवा......चांगले दिवस येणारच !!!!!!
https://www.youtube.com/watch?v=0vANeT930Bg
No comments:
Post a Comment