मुंबईचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काये माहितीये ? रस्त्यावर
गाड्या हाकणारी “बेअक्कल” माणसं. त्यात रिक्षावाल्यांचा पहिला,
बाईक वाल्यांचा २रा आणि कार चालकांचा “सन्मानपूर्वक” ३रा नंबर लागतो.
सिग्नल ही एक “अफवा” आहे मुंबईत. तो पाळायचा वगैरे नसतोच;
उलट सिग्नल वर आपल्याला पुढे कसं जाता येईल...याची चिंता जास्त करायची असते. तेव्हा
तुम्ही सिग्नल पाळत असाल तर हा ब्लॉग बिलकुल वाचू नका. कारण सिग्नल पाळणारे “मूर्ख”
असतात मुंबईत.
अशा शहरात अनेक माणसं फक्त Ambulance पोहोचू शकली नाही Hospital ला म्हणून नाहक मरतात. कारण इथे “लेन
ड्रायविंग” कोणाला माहित नसतं. Ambulance आली की तिला साईड न देता आपण तिच्या मागून हाकायची
गाडी, म्हणजे आपल्याला “फटाफट” पुढे सरकता येतं. अग्निशमन दलाच्या गाडीची भीती
वाटते म्हणून साईड देतील कदाचित, पण Ambulance ला कधीच नाही. हे नक्कीच पाहिलंय मुंबईच्या
रस्त्यावर.
पावसात खड्डे होतात म्हणून
प्रशासनाला दोष द्यायचा. हो बरोबर आहे; पण आपलं पण कर्तव्य आहे न रोडवर जबाबदारीने
गाडी चालवायचं? कशीही गाडी चालवून कसं चालेल ? चालतंय मुंबईत कारण सगळे मेलेत,
सगळ्यांना फक्त पुढे जायचंय, फक्त “माझा” वेळ महत्वाचा बाकी लोकांचं नुकसान होवो
नाहीतर ते मरोत. मी पुढे जाणारच!!!!
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर खूप
अपघात वाढलेत नै? का वाढलेत? हे जे हाय स्पीड वाले मूर्ख ड्रायवर आहेत त्यांच्यामुळे. माझ्या एका मित्राची
गाडी एक्स्प्रेस वे वर ट्राफिक मध्ये उभी असताना मागून येवून एका ट्रक ने धडक दिली
व त्याचा उजवा हात जखमी होवून कापावा लागला... असे अनेक अपघात रोज होतात. आपण दोष
चुकीच्या माणसांना देतोय. प्रशासन काही करू शकत नाही. आपल्याला आपला स्पीड कंट्रोल
करावा लागेल. पण यासाठी बुद्धी पाहिजे जी आपण गहाण ठेवलीये. माकडाच्या हातात एक मस्त
गाडी आहे, फक्त त्याला ती जोरात हाकणे हेच जमतं.
कोणाला ऑफिसला जायचंय, कुणाला घरी,
कुणाला अजून कुठेही, पण रस्त्यावर बाकीचे लोक आहेत याचा विसर पडलाय. फक्त मी आणि
माझी गाडी. मग ट्राफिक लागलं तर मी wrong
side ने जाणार कारण मला पुढे जायचंय; बाकी
लोक गेले @#$%त; ही आहे आजच्या मुंबईची
गोष्ट.
आता थोडं प्रशासनाबद्दल पण –
आमच्या लोकसभा मतदारसंघात “खासदार” साहेब निवडून आले. सगळ्या जगाने सोशल मिडिया वर
account काढला म्हणून यांनी पण काढला. आता त्यावर रोज
कुठल्यातरी उद्घाटन सोहळ्यांचे फोटो किंवा तेच ते “शुभेच्छुक” वाले फोटो टाकत
असतात. मतांची भीक बरोबर मागता येते पण जनतेची हाक ऐकू येतच नाही.
त्यांना मी पत्र लिहिलं आणि Twitter वर
टाकलं कारण साहेब कुठून भेटणार आम्हाला निवडणुकीशिवाय ? विषय होता आमच्या आरे
रोडवर रस्ता दुभाजक टाकण्याचा !!!!
अहो का म्हणून काय विचारता ? एकदा या आरे रोडवर आणि बघा
किती मस्त ४ लेनच्या रोडवर लोक ३ लेन आपल्या “बापाच्या” असल्याप्रमाणे वापरतात आणि
वरून मस्त attitude पण देतात. एकदा या न
अनुभवायला.....सकाळी १० वाजता या. ऐन गर्दीच्या वेळी मस्त डेमो मिळेल. कारण सिग्नल
आहे, पोलीसही आहेत, पण रस्ता बापाचा आहे न आपल्या; हाका गाड्या !!!!! कोण विचारतोय? सो, खासदार साहेबांनी एक साधा रिप्लाय पण केला नाही त्या Tweet ला. असो.
ट्राफिक पोलिसाने आपलं काम नीट केलं तर मुंबईत “जाम” होणार
नाही. पण नाही. त्यांचा collection day आल्याशिवाय ते
नाही करत काम. त्यांना पगार मिळत नाही, पडक्या इमारतीत
राहतात, त्यांना त्यांच्या पालकांनी जबरदस्ती ही नोकरी
करायला लावलीये त्यामुळे ते स्वताचं काम नीट करत नाहीत. यात त्यांचा तरी काय
दोष..... (कुठल्याही परिस्थितीत आपलं “काम” नीट करणारे फक्त भारतीय सेनेतले जवानच
आहेत इथे)
सो, बेसिकली ही परिस्थिती कधीच
सुधारणार नाही. कारण आपण जनता म्हणून सुधारणार नाही. कारण आपण लाल सिग्नल मानत
नाही. दुसरा उभा राहिला की आपण हॉर्न वाजवून त्याला शिवी देतो. पोलिसाला चिरीमिरी
देवून पुढे निघतो. पोलीस पण वरून आदेश आल्याशिवाय काम करत नाहीत. हे Vicious
Circle आहे. कधीच न संपणारं !!!!
या सगळ्यात मी एकच ठरवलंय. मी सिग्नल पाळणार. माझ्या मागे
उभे राहून कितीही हॉर्न वाजवा, मी हलणार नाही. सिग्नल हिरवा झाला की पुढे जाणार.
काय करायचं ते करा. फक्त घरी कोणीतरी वाट पाहत असतात, तुमच्याही आणि माझ्याही; सो,
गाडी चालवताना निदान स्वताचा नाही तरी दुसर्याचा जीव धोक्यात घालू नका !!!!
अर्थात एवढं समजण्याची लोकांची कुवत असेल तरच.....





